शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

इंदवे गावातील वीरगळ

युध्‍दात असो, गावच्‍या रक्षण करताना देश धर्मासाठी, प्राण्यांच्या रक्षणासाठी ज्‍या पुरूषांनी आपल्‍या प्राणाची आहुती दिली, त्‍यांना वीर पुरूष या नावाने ओळखले जाऊ लागले. अशाच वीरपुरूषांनी दिलेल्‍या आत्मबलिदानाच्‍या स्‍मरणार्थ राजाकडून,गावकरी,किंवा कुटुंबाकडून त्या वीरपुरूषांची स्‍मारके उभारली गेली त्‍यानांच वीरगळ असे म्‍हणतात, 

वीरगळ मध्ये दोन प्रकार असतात,
एक आयुताकृती दगडाची पाटी सारखी आणि दुसरी चारी बाजूनी कोरलेली,
चौकोनी दगडाच्या वीरगळ इंदवे ह्या गावात आहेत.

समोरील बाजूला युद्धप्रसंगात वीर जमिनीवर ढाल तलवारीने लढताना मरण पावलाय.

मागच्या बाजूला वीराला स्‍वर्गप्राप्‍ती होते व त्‍यास स्‍वर्गात घेऊन जाताना वीराच्‍या दोन्‍ही बाजूला अप्सरा आहेत.


डाव्या बाजूला वीराला शिवपिंड पुजन करताना त्‍याला मोक्ष प्राप्त मिळते.


उजव्या बाजूला चंद्र व सुर्य कोरलेला असतो याचा अर्थ असा की चंद्र व सुर्याप्रमाणे या वीराची किर्ती अजरामर राहो,,,

वीरगळच्‍या सर्वात वरील भागात कलश कोरलेला असतो.
अशा प्रकारे वीरगळच वाचन केलं जातं.

(इथे चार ते पाच वीरगळ असून, एकात व्यक्तीसोबत समोरासमोर युद्ध खेळताना आलेलं वीरमरण आहे, आणि दोन गळ घोड्यावर बसून युद्ध खेळताना आलेलं विरमरण ह्यावर आहेत)

ह्या वीरगळ जीर्ण झाल्या असून, त्या जतन करणं गरजेचं आहे)

-जयंत देसले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा